पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेरणादायी विचार

    नियम स्वतःसाठी ठेवा..            आपण असं जगताना काय करतो..?? सहजच प्रत्येक गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. कोणत्या गोष्टी केल्या तर काय होईल आणि काय नाही होणार हे सर्व. पण, हे सर्व नियम अटी सांभाळताना आपण स्वतःला हरवत असतो.त्याने काय करावं काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. प्रत्येकाला जे योग्य वाटत ते त्याने करावं. पण ते करताना त्यातलं चुकीचं सावट पूर्ण पांघरून जावू नये म्हणजे झालं.आत्ता कोणासाठी नियम असावे. त्याचं उत्तर आहे स्वतःसाठी मग कोणी ही असेल. आत्ता यात त्या आधी दोन गोष्टी येतात एक आवड आणि दुसरी नावड थोडक्यात, काय तर मला आवडत म्हणून मी करावं आणि समोरच्याला आवडेल का याचा विचार करणं अशा गोष्टी यात समाविष्ट होतात. नियम : -  १) स्वतःच्या मनाला रोज एक प्रश्न विचारा. २) रोज नवनवे विषय घ्या, त्यात अभ्यास करा, नवं ज्ञान मिळवायच्या प्रयत्नांत रहा. ३) कोण काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्यायचा ४) जी वेळ भेटेल मोकळा वेळ असेल ती आपली हक्काची वेळ आहे अस म्हणून सुरूवात करा. ५) यात मी माझं स्वतःचं मत सांगतो हरलो तर अनुभव मिळेल आणि जिं...

प्रेरणादायी विचार

स्वतःवर विश्वास ठेवा आणि ठाम राहा..             विश्वास ही अशी गोष्ट आहे ना की, आपण जर एखाद्या गोष्टीत दाखवला तर त्या दुप्पट आपल्याला मिळतो आणि त्या गोष्टीत भक्कमपणा येतो. यात नात असू शकेल, आपली स्वप्न, आणि मुके प्राणी या सर्वात मोठा समाविष्ट घटक म्हणजे विश्वास. जो कुणी काही सांगून, कुठे काही बोलून कुणाबद्दलचा खरा विश्वास कमी होतच नाही. अशा ठिकाणी नाती, आपली स्वप्न जास्त टिकतात. आशेची किरणं तिथंच दिसू लागतात जिथं काही तरी होण्याचा विश्वास असतो. आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि करताना काही दिवस अथवा महीने प्रयत्न करून सोडून देतो. आपल्याला सवय लागलेली असते की कोणती ही गोष्ट झाली तरी या जलद गतीच्या जमान्यामध्ये आपल्याला यश आपली स्वप्न ही अगदी सहज आणि जलद पूर्ण व्हावी आणि हवं ते मिळावं असं वाटतं. पण जिथं संघर्ष नाही ते यश ही चिरंतन नाही. जिथं स्वतःवर विश्वास नाही तिथं संघर्षाला ही अर्थ नाही.                  माझ्या मतांचा हेतू एवढाच आहे की, काही ही झालं तरी आपला आपल्या वर विश्वास असायला हवा.   एक तर असफल होऊ अथवा यशस्व...

प्रेरणादायी विचार...

  वेळ आणि ते         आपण जर म्हटलं ना मला कालच्या वेळेत काही काम करायचं आहे. तर, ते शब्दातून पूर्ण होईल पण प्रत्यक्षरित्या होण नाहीच. वेळ ही फार जलद आहे आणि एकदा निसटून गेली की कदापि न परत येणारी गोष्ट आयुष्यात गेलेली वेळ आणि दूर गेलेली माणसं कधीच परत त्यांच्या सहवासात आपलं आयुष्य येत नसतं.काही सेकंद एक पाऊल अशा पद्धतीनं आपण चालतो चालताना तोल जाईल का हे सुध्दा मनात आणत नाही आपण का तर तेवढ्या वेळेत कुठे तरी निश्चित ठिकाणी जायचं आहे. काही वेळ नाही शक्य होत पण बहुतांश वेळा आपण मागे पडतो का नाही ना.                वेळ आजवर कुणासाठी कधीच थांबली नाही. अगदी मी सुद्धा अनेक वेळ कारणांसाठी वेळेचा आधार घेतला होता. पण, हरकत नाही ज्यात आवड आहे त्यात जसा वेळ मोकळा असेल तेव्हा आपण आपली आवड आवड न ठेवता तिला थोडी सवड काढून नक्की खेळती ठेवली पाहिजे.एक झाड असत आणि त्यावर दोन चिमण्या राहतात एक तशी स्वाभाविक आणि व्यावहारिक असते. ती स्वतः स्वतःच्या कामांना प्राधान्य देत असते दुसरी थोडी अवखळ मज्जा मस्ती करणारी असते. तिला कोणती काम वेळेवर व्हावी ...